नाती जशी जुळतात, तशीच ती रोज नवनवे भावविश्व गाठत असतात. रोजच्या आयुष्यात नवे अनुभव देत असतात. कधी कधी काही देऊन जातात तर कधी कधी काही तरी घेऊन जातात... काही तरी शिकून जातात तर कधी कधी काही शिकवून जातात... यानेच आपले जीवन समृद्ध होत जाते आणि समृद्ध अनुभवांची शिदोरी पुरवून जातात. जीवनात नवरसांनी समृद्ध असे अनुभव असतील तरच त्याला अर्थ आहे.
मात्र कधी कधी नाती उलगडताना ती गुंता निर्माण करून जातात. गुंतुनी गुंत्यात साऱ्या, गुंता माझा वेगळा. म्हणजे सर्वांच्या आयुष्यात गुंता सारखाच असतो, मात्र बघायचा दृष्टीकोण प्रत्येकाचा वेगळा. म्हणूनच प्रत्येकाचा अनुभव वेगळा. हे कधी सुखद तर कधी दु:खद. फक्त थोडासा वेळ देऊन ह्या गुंत्याकडे नवीन दृष्टीकोणाने पहिला तर हा सोडवणं सोपं जातं. गुंते सोडवायचे कि अजून वाढवायचे हे आपल्यावर! गुंत्या शिवाय आयुष्य म्हणजे अळणी जेवण.
Showing posts with label sorrow. Show all posts
Showing posts with label sorrow. Show all posts
Wednesday, July 11, 2012
गुंतुनी गुंत्यात साऱ्या...
Labels:
anubhav,
bhav vishwa,
consultation,
dukha,
dukkha,
experience,
goti,
gunta,
jeevan,
life,
marathi,
nati,
relations,
sorrow
Subscribe to:
Posts (Atom)